02 August, 2023

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सर्व मजूरांनी

 पोस्ट पेमेंट बँकेमध्ये एनपीसीआय व्हेरीफिकेशनसह आधार लिंक करुन करुन घ्यावेत


हिंगोली (जिमाका), दि. 02  :  राष्ट्रीय रोजगार हमी कायदा, 2005 अन्वये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना राबविली जाते. या योजनेचे मुख्य ध्येय ग्रामीण भागातील स्वेच्छेने काम करायला तयार असलेल्या प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आर्थिक वर्षात किमान 100 दिवसाच्या मजुरीच्या रोजगाराची हमी देऊन कायमस्वरुपी उत्पादक मालमत्ता निर्माण करणे हे आहे. तसेच ही योजना ग्रामीण शेतकरी/शेतमजूरांना सामाजिक सुरक्षा, महिला आणि दुर्बल घटकांचे सक्षमीकरण आणि पंचायत राज संस्थांना बळकट करुन रोजगार देण्यावर लक्ष केंद्रित करते.

ग्रामीण भागात राहणाऱ्या मग्रारोहयो नोंदणीकृत कुटुंबातील प्रत्येक प्रौढ सदस्य ज्यांचे वय जॉबकार्डमध्ये आहे त्यांना ग्रामपंचायतीमधील योजनेंतर्गत अकुशल कामासाठी काम मागणी केल्याच्या पंधरा दिवसांच्या आत संबंधित मजुराला काम प्रदान केले जाते. त्यांच्या कामाची मजूरी ही त्यांचे आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये NPCI द्वारे प्रदान केली जाते. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मजूरांचे बँक खाते हे तालुका स्तरावरील तसेच ग्रामीण स्तरावरील पीडीसीसी बँक, को. ऑपरेटीव बँकेत एका पेक्षा जास्त बँकेत खाते असणे तसेच सदर बँक खाते NPCI व्हेरीफिकेशन सह नसल्याने मजुरांची मजूरी व मग्रारोहयो अंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचे कुशल देयके रिजेक्शन (Rejection)  मध्ये येत आहेत. त्यामुळे सदरचे देयके प्रलंबित राहत असून मजूरांना वेळेत मजूरीची अदायगी होत नाही.

त्यामुळे जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सर्व मजूरांना तसेच लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी  आपल्या जवळ असलेल्या पोस्ट पेमेंट बँक मध्ये NPCI व्हेरीफिकेशन सह 200 रुपये (अक्षरी दोनशे रुपये मात्र ) माफक दरामध्ये आधार लिंक करुन बँक खाते चालू करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 

 

No comments: