29 April, 2024

उष्माघातात नागरिकांनी स्वतःचा बचाव करावा - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 29 : उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी उष्माघातात नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. काय करावे : • उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडीओ, टि.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा. • तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे. • हलकी, पातळ व सूती कपडे वापरावेत. बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, हॅट, बुट व चपलाचा वापर करण्यात यावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. • जर आपण बाहेर उन्हात काम करीत असाल तर हॅट किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा. तसेच ओल्या कपडयांनी डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा. • शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस., घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा वापर नियमित करण्यात यावा. • अशक्तपणा, स्थूळपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. • गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे. • घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. • पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे. • कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. • सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळणसाठी कामगारांना सुचित करण्यात यावे. • पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. • गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी. काय करू नये : • लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. • दुपारी 12.00 ते 4.00 या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. • बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत. तसेच दुपारी 12.00 ते 4.00 या कालावधीत बाहेर काम करण्याचे टाळावे. • उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. (तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.) • शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेय इत्यादींचा वापर टाळावा. • शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने (Proteins) असलेले अन्न टाळावे. *******

No comments: