19 February, 2024

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

उद्याचे सुजाण नागरिक घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य युवा पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक -अपर जिल्हाधिकारी • ‘‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’’ या गीताचे सामूहिकरित्या गायन हिंगोली (जिमाका), दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे 350 वे राज्याभिषेक वर्ष पूर्ण जगभर साजरे होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य महान आहे. त्यांच्या कार्याचा इतिहास मोठा आहे. त्यांचे कार्य पुस्तकात न मावणारे आहे. त्यांची मार्गदर्शक तत्त्वे, कार्य, जबाबदाऱ्या, स्वातंत्र हे त्यांच्यामुळेच आपणाला मिळाले आहे. आपण जीवन जगत असताना त्यांचे प्रतिबिंब त्यात दिसत असते. उद्याचे सुजाण नागरिक घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, गड-किल्ले यांची माहिती युवा पिढीपर्यंत पोहोचविणे हेच खरे अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी पुष्पहार अर्पण व अभिवादन करुन जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक नागेश बोलके, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, सचिन जोशी, संतोष बोथीकर, मधुकर खंडागळे, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे 350 वे राज्याभिषेक वर्ष साजरे केले जात आहे. त्यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात यावर्षीची जयंती शासनस्तरावर साजरी करण्यासोबतच विविध सामाजिक संस्था, संघटना, शैक्षणिक संस्थांनी देखील आपल्यास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरी करण्यात येत असल्याचे सांगून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती सांगितली. तसेच याप्रसंगी आम्रपाली चोरमारे, विजय घ्यार, कुसुम भिसे, माया नरवाडे यांनी छपत्रती शिवाजी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ‘‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’’ या राज्य गीताचे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिकरित्या मोठ्या उत्साहात गायन करण्यात आले. यावेळी जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात रांगोळीतून शिवरायांची प्रतिमा काढण्यात आली. ***

No comments: