07 February, 2024

 

राष्ट्रीय सेवा योजना शिबीरात येळी येथे जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत

बालविवाह प्रतिबंध कायद्याची जनजागृती

 


हिंगोली (जिमाका), दि. 07 :  येथील आदर्श महाविद्यालयाच्या वतीने हिंगोली तालुक्यातील मौजे येळी येथील जिल्हा परिषदेत शाळेत आयोजित राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 विषयी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.  

यावेळी कार्यक्रमामध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी महिला सबलीकरण व बाल विवाह एक समस्या या विषयावर एक सक्षम महिला म्हणजे काय, दैनंदिन जीवनात अगदी सहजतेने विविध भूमिका पाडतांना महिला या समाजाच्या आधारस्तंभ बनले आहे, कधी प्रेमळ कन्या तर कधी वात्सल्यपूर्ण माता तर कधी सक्षम सहचारीनी अशी विविध नाती अत्यंत कुशलतेने आणि कोमलतेने त्या निभावत असतात, महिला ही आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सबल होत असतांना आपल्याला दिसत आहे. परंतु सामाजिक असमानता, कौटुंबिक हिंसा, अत्याचार आणि आर्थिक परावलंबित्व यातून स्त्रियांची सुटका व्हायची असेल तर गरज आहे महिला सबलीकरणासाठी आपण सक्षम आहोत याची खात्री महिलांनी बाळगणे गरजेचे आहे. मी स्त्री आहे, अबला आहे असा विचारसुध्दा करु नका. या आंतरीक असमानतेमुळे काहीही घडणार नाही तुमचे अधिकार प्राप्त करण्यासाठी गरजचे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, महिला सबलीकरण ही काळाजी गरज आहे. महिला सबल होत आहेत आणि सबल महिलेतूनच समाज सक्षम होत आहे व त्याच बरोबर बाल विवाह म्हणजे काय, बालविवाहाची कारणे, दुष्परिणाम य प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली.

यामध्ये बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार मुलीच्या वयाची 18 वर्ष व मुलाच्या वयाची 29 वर्ष पूर्ण होण्याच्या आगोदर लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे, असे विवाह बेकायदा ठरतात आणि अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व दोन वर्षे सक्त मजुरांची शिक्षा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आल्या असून या समितीचे अध्यक्ष सरपंच आहेत व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहेत. या सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रात बालबिबाह होणार नाहीत व याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, असे सांगितले.

जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी सर्व उपस्थितांकडून बाल विवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेचे वाचन करुन शपथ घेण्यात आली, चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फूले बाल संगापन योजना, बालक म्हणजे काय व बालकांसाठी तात्काळ मदत करणारी चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 या टोलफ्री क्रमांकावर माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता याची गोपनीयता राखली जाते. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी बाल विवाह होणार असल्याबाबतची माहिती मिळताच चाइल्ड हेल्पलाईन 1098 किवा पोलीस हेल्प लाइन क्रमांक 112 यावर माहिती द्यावी अशी माहिती उपस्थित गावकऱ्यांना दिली.

या कार्यक्रमासाठी चाईल्ड हेल्पलाईन समुपदेशक अंकुर पाटोडे, आदर्श महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा याजना शिबीर संचालक प्रा. डॉ. एस. एस. नगरकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व रा.से.यो. जिल्हा समन्वयक प्रा.डॉ. एस.पी हाटकर, प्रा.डॉ. बंगाळे, प्रा. राठोड, प्रा, वऱ्हाड, प्रा. डॉ. विद्या खंडारे, प्रा. मिनाक्षी जाधव व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक, शाळेतील विद्यार्थी, किशोर वयीन मुले- मुली व गावातील ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते.

******

No comments: