25 September, 2023

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

ई-केवायसी व बँक खात्याला आधार संलग्न करण्यासाठी 27 सप्टेंबर पर्यंत अंतिम मुदत

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 : केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबाना निश्चित उत्पन्न देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबास प्रती वर्ष 6 हजार रुपये रकमेचा लाभ देण्यात येतो. केंद्र शासनाने या योजनेचा लाभ पुढे सुरु ठेवण्यासाठी लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे, बँक खात्याला आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदीनुसार माहिती अद्यावत करणे बंधनकारक केलेले आहे. ई-केवायसी व बँक खात्याला आधार संलग्न करण्यासाठी कृषि विभागातर्फे मागील एक वर्षापासून आवाहन करण्यात येत आहे. परंतु हिंगोली तालुक्यातील 3 हजार 921 लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही व 1 हजार 146 लाभार्थ्यांनी बँक खात्याला आधार सलग्न केले नाही. अशा लाभार्थ्यांना ई-केवायसी व बँक खात्याला आधार संलग्न करण्यासाठी दि. 27 सप्टेंबर, 2023  पर्यंत शेवटची संधी देण्यात आली आहे. यानंतर ई-केवायसी व बँक खात्याला आधार संलग्न न केलेले लाभार्थी या योजनेचा लाभ मिळण्यापासून अपात्र होणार आहेत.

हिंगोली तालुक्यातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी दि. 27 सप्टेंबर, 2023 पर्यंत ई-केवायसी व बँक खात्याला आधार संलग्न करुन घ्यावे, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

******

No comments: